राहुरी गटसाधन केंद्र या कार्यालयीन वेबसाईटवर सर्व शिक्षकांचे स्वागत
Pages
- Home
- गटाची ओळख
- केंद्राची माहिती
- अधिकारी परिचय
- शाळांची माहिती
- शालेय पोषण आहार
- सरल अपडेट
- उच्च प्राथमिक विभाग
- अपंग समावेशित कार्यक्रम
- मुलींचे शिक्षण
- महिना वाइज वाढदिवस
- लाभाची योजना माहिती
- आर.टी.ई.
- सर्व शिक्षा अभियान
- माध्यमिक विभाग
- यु-डायस राहुरी
- शालार्थ पगार
- महत्वाची परिपत्रके
- शिष्यवृत्ती
- DCPS आय डी राहुरी
- फोटाे गॅलरी
- वंचिताचे शिक्षण
- दाखला online
- शालार्थ आय डी राहुरी
Wednesday, December 10, 2014
Saturday, November 1, 2014
Thursday, October 30, 2014
शालेय पोषण आहार विवरण
माहे जुन ,जुलै ,ऑगस्ट ,सप्टेंबर 2014 चे स्वयंपाकी मानधन व माहे जुन 2014 ,एप्रिल 14 , टंचाई व फरक बीले
विवरण येथे पाहा
विवरण येथे पाहा
Saturday, September 27, 2014
Monday, August 11, 2014
Saturday, August 2, 2014
Wednesday, July 23, 2014
Wednesday, June 18, 2014
Thursday, June 12, 2014
Saturday, June 7, 2014
शिवशाहीर शिक्षक
गर्भगिरी पर्वतराजींत मांजरसुंभे (मंजर -ए-सुभा) वसलेय. निजामशाहीत या गावातील गडावर औरंगाबादकडून येणार्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहाळणीचे ठिकाण बांधले आहे. या गडाशेजारीच गोरक्षनाथ गड अशा धार्मिक, ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गावात जन्मलेले कोणाचे इतिहासप्रेण जागे होणार नाही. या डोंगराच्या अंगाखांद्यावर बसून शहाजीराजांनी पुरूषार्थ गाजवितच मराठेशाहीची बिजे रोवली. शिवशाहीच्या या धगधगता इतिहासाचा वाड्यज्ञ चालविण्याचा विडा मच्छिंद्र कदम यांनी उचललाय. त्यातूनच त्यांत्यातील शाहिराचा जन्म झाला. हातात डफाऐवजी ते ढाल, तलवार घेऊन ते इतिहासाची पाने उलगडतात कोणत्याही बिदागीशिवाय. पेशाने शिक्षक असलेल्या आगळयावेगळया शाहिराबद्दल..
| ||
| ||
गर्भगिरी पर्वतराजींत मांजरसुंभे (मंजर -ए-सुभा) वसलेय. निजामशाहीत या गावातील गडावर औरंगाबादकडून येणार्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहाळणीचे ठिकाण बांधले आहे. या गडाशेजारीच गोरक्षनाथ गड अशा धार्मिक, ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गावात जन्मलेले कोणाचे इतिहासप्रेण जागे होणार नाही. या डोंगराच्या अंगाखांद्यावर बसून शहाजीराजांनी पुरूषार्थ गाजवितच मराठेशाहीची बिजे रोवली. शिवशाहीच्या या धगधगता इतिहासाचा वाड्यज्ञ चालविण्याचा विडा मच्छिंद्र कदम यांनी उचललाय. त्यातूनच त्यांत्यातील शाहिराचा जन्म झाला. हातात डफाऐवजी ते ढाल, तलवार घेऊन ते इतिहासाची पाने उलगडतात कोणत्याही बिदागीशिवाय. पेशाने शिक्षक असलेल्या आगळयावेगळया शाहिराबद्दल.. राठी मातीचा इतिहास, शूर मराठय़ांची कहाणी, छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांनी लढलेल्या लढाया यांची माहिती भावी पिढीला कळावी, त्यातून त्यांना बोध घेता यावा यासाठी पोवाडे, व्याख्यानाद्वारे महानाट्याद्वारे, स्वराज्याचा इतिहास जागविला जात आहे. महाराष्ट्राने अनेक शिवशाहीर दिलेले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यातील एक खेडेगावातून गर्भगिरी पर्वत रांगेतील डोंगरपठारावर हातात तलवार घेऊन नरवीर तानाजीच्या वेशात इतिहास उलगडून दाखवतात. गर्भगिरीच्या कुशीतील मांजरसुंभा येथील ते सुपूत्र. नवोदित शिवशाहीर म्हणून नावारूपाला आले आहेत.
कदम गुरूजी राहुरी तालुक्यात मोकळओहळ येथे नोकरीत आहेत. नोकरी करत असताना युवा पिढीला मराठय़ांचा इतिहास समजून सांगण्याचे काम करत आहेत. आपल्या बुलंद आवाजाने संपूर्ण शिवकाळ उभा करण्याची किमया ते सहज निर्माण करतात. 'छत्रपती शिवराय व आजचा महाराष्ट्र' या विषयावर तानाजी मालुसरे यांच्या वेषात श्रोत्यांपुढे प्रत्यक्ष ऐतिहासिक प्रसंग शब्दानेच उभे करणारे शिवकाळातील उदाहरणे व आजच्या काळातील उदाहरणे तुलनात्मक सादर करून लोकांना पोटधरून हसायला लावणारे. मात्र, हे करत असताना श्रोत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत असून सलग दोन तास एकाच जागी खिळवून ठेवण्याचे कसब या नवोदित शिवशाहीराने कमावले आहे. तरूणपणापासून आपण शिवशाहीचा इतिहास इतरांना समजावून सांगवा असे वाटत होते. मात्र, त्यावेळची परिस्थिती वर मात करणे आद्य कर्तव्य होते. यासाठी शिक्षण आणि नोकरी मिळवणे गरजेचे होते. नोकरी मिळाली, आयुष्यात स्थिरता येत आहे, असे लक्षात येताच सुरूवातील राजकीय व्यासपीठावरून भाषणांना सुरूवात केली. राजकारणी मंडळींनीदेखील माझ्या वक्तृत्वाचा फायदा घेतला. सुरूवातीला माझ्या ते लक्षातच आले नाही. अनेक सभा मी गाजविल्या. मात्र, त्यानंतर राजकारणी आपला वापर करत असल्याचे माझ्या लक्षात आले. यामुळे राजकारण्याच्या चक्रव्यूवहातून बाहेर पडण्याचा निश्चिय केला आणि नव्या जोमाने पुन्हा शिवशाहीचे संदर्भाचा अभ्यास आणि वाचन सुरू केले. कदम हे इतिहासाचे गाढे अभ्यासक असून, त्यांचे शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, तरुण मंडळे, सप्ताह कार्यक्रम, वाढदिवस, लग्नाच्या वरातीऐवजी कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांतून त्यांच्या शाहिरीची ललकारी ऐकायला मिळते. श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेण्याची कला त्यांनी अवगत केल्याने शाळा ,महाविद्यालयातील तरूण कदम यांच्या व्याख्यानाने भारावून जातात. त्यांच्या व्याख्यानातून मातृभक्ती, गुरूभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रृणहत्या यांचे सोदाहरण व्याख्यानाने तरुणांना अंतर्मुख करण्याची क्षमता कदम तरुणांमध्ये निर्माण करतात. त्यांचे आतापर्यंत नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले असून, गर्भगिरीची ही शिवशाहिरी राज्याच्या कानाकोपर्यात निनादत आहे. त्यांचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. शिवशाहीचे व्याख्याने देतांना इतर शाही हातात डफ घेतात. मी मात्र, तलवार आणि ढाल धरतो. त्यातून वेगळेच वातावरण तयार होते. अंगावर तानाजीचा पेहराव, हात ढाल, तलाव आणि मुखी शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास यातून सर्ववातावरण भारावून जाते. व्याख्यानाच्या दोन तासांच्या कालावधीत मी स्वत:ला विसरून जातो. शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांच्या पराक्रम, त्यांचे विचार आणि आचार आचारणात आणणे आवश्यक आहे. यासाठी आपला प्रयत्न सुरू असून शिव व्याख्यानाच्या माध्यमातून जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
(2 जुन 2014 रोजी लोकमत पेेपर मध्ये प्रसिद्ध बातमी झालेली आमच्या तालूक्यातील बहुगुण संपन्न व्यक्तीमत्व )
परिचय- श्री.मच्छिंद्र कदम
उपाघ्यापक, मोकळओहळ, केंद्र उंबरे ,ता.राहूरी
@SGTelore
|
Monday, June 2, 2014
Monday, May 19, 2014
Friday, May 16, 2014
Thursday, May 8, 2014
पदवीधर शिक्षक चेकलिस्ट 2014-2015
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाची सुचना-
यादी पाहून सर्व यादीतील शिक्षकांनी पंचायत समिती राहूरी येथे ठेवलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी यावे. जर यादीसंदर्भात हरकत असेल तर लेखी देण्ो .सदर कार्यवाही 12 मेच्या आत करणे. अन्यथा नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.
महत्वाची सुचना-
यादी पाहून सर्व यादीतील शिक्षकांनी पंचायत समिती राहूरी येथे ठेवलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी यावे. जर यादीसंदर्भात हरकत असेल तर लेखी देण्ो .सदर कार्यवाही 12 मेच्या आत करणे. अन्यथा नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.
Wednesday, April 30, 2014
तालुक्यातील सेवाजेष्ठता यादी 2014
NEW तालुकापातळी सर्व संवर्गातील शिक्षक सेवाजेष्ठता यादी सन 2014
महत्वाची सुचना;
सर्व शिक्षकांनी सेवाजेष्ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.
महत्वाची सुचना;
सर्व शिक्षकांनी सेवाजेष्ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.
Tuesday, April 29, 2014
जिल्हास्तरासाठी तालुक्यातील सेवाजेष्ठता यादी
सर्व संवर्गातील शिक्षक सेवाजेष्ठता यादी सन 2014
महत्वाची सुचना;
सर्व शिक्षकांनी सेवाजेष्ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.
महत्वाची सुचना;
सर्व शिक्षकांनी सेवाजेष्ठता यादी चेक करुन काही हरकती असेल तर दिनांक 10-05-2014 पर्यंत पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे लेखी देणे.
Sunday, April 20, 2014
आजचे शिक्षण : एक दृष्टीक्षेप
मा.श्री.बाळासाहेब धनवे , गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती,राहुरी
सुसंस्कृत समाजाच्या जिवनात शिक्षणाला पायाभुत महत्व आहे.त्यामुळे आजच्या शिक्षणाचा विचार हा नेहमी उदयाच्या संदर्भात करावा लागतो.लहान वयातून व्यक्तीचे शिक्षण घरच्या व आजूबाजूच्या परिसरातील वातावरणातून होत असते याला आपण सहज शिक्षण म्हणतो. व्यक्तीच्या वृत्ती - प्रवृत्ती घडविण्याचे बरेचसे कार्य या सहज शिक्षणाद्वारे होत असते. वातावरणातून सहजतेने होत जाणारे शिक्षण हे बालकाच्या आयुष्याचा पाया घालणारे शिक्षण असते.एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच अग्रक्रमाने बालकांना प्रथम स्थान देऊन, घरातील व परिसरातील सहज शिक्षणाकडे एक पायाभूत अशी शिक्षण व्यवस्था म्हणून पाहावे लागेल. या करीता आई वडिलांचे रुपांतर सृजाण पालकांमघ्ये व्हावे यासाठी पालक शिक्षणाची, पालक प्रशिक्षणाची सोय आपल्याला सार्वत्रीकरीत्या निर्माण करावी लागेल व पालक प्रबोधन केंद्रे ठिकठिकाणी उघडावी लागेल. त्याच बरोबर वृत्तपत्रे, मासिके,आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट यांच्या साह्याने शिक्षण सहजतेने व सातत्याने बालकांकरीता मिळत राहिल अशी व्यवस्था समाजात निर्माण करावी लागेल.6 ते 14 वर्षापर्यंतच्या वयोगटाचा विचार औपचारीक शिक्षण व्यवस्थेतून सहज शिक्षण असा होत असतो. बालकांच्या जिवनातील हा काळ विविध क्षमतांच्या दृष्टिने पाया भरणीचा काळ असल्याने या काळात बालकांना मिळणारे पोषक वातावरण आणि शिक्षण हे त्यांच्या जिवनावर दूरगामी परिणाम करणारे असते. त्यामुळे समाजाचे या वयोगटावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत व्हायला हवे. बरेचदा कुटुंबातील व आजूबाजूच्या परिसरातील वातावरण पोषक नसते. अशा वेळी औपचारीक शिक्षणव्यवस्था बाल शिक्षण घडविण्यास कामी येते. बालकांच्या बाबतीत घर,परिसर, शाळा या सर्वांमध्ये एक सुसंगती निर्माण होणे गरजेचे असते. पालक प्रबोधन, शिक्षक प्रशिक्षण व समाज प्रबोधन या सर्वांचा आग्रह बाल शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी झाला पाहिजे.
शिक्षण विषयक वातावरण निर्मिती ही बालकेंद्री शिक्षणासाठी प्राथमिक अट आहे. शाळांमध्ये प्रयत्नपूर्वक व विचारपूर्वक असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली शाळा ही बालसुलभ व मनाला आकर्षित करणारी असेल तर मुलांना तेथे दररोज जाणे आवडेल. चांगली शाळा, इमारत, शाळेसमोर मौदान, सुंदर परसबाग, हवेशिर वर्गखोल्या अशा सर्व गोष्टी मुलांचे मन आकर्षित करणाज्या आहेत.शाळेतील वातावरण मुलांना रोज शाळेत यावेसे वाटेल म्हणजेच आनंद देणारे,खेळातून शिकता येणारे,असे शिक्षण सर्वव्यापी होऊ शकेल. हे शिक्षण जिवनोपयोगी व व्यावहारीक तसेच भविष्यात उपजिविकेचे साधन प्राप्त करून देणारे असेल.सध्याच्या शाळांची परिस्थिती पाहता आनंदायी शिक्षणाचे उद्यिष्टे गाठण्यासाठी तीन बदल अपेक्षित आहेत.1. शाळांच्या भौतिक सुविधामध्ये सुधारणा घडवून आणने.2. शाळांमधून शिक्षणाभिमुख व विद्यार्थीप्रेमी असा प्रेरक शिक्षक वर्ग तयार झाला पाहिजे.3. शिक्षणाची पध्दती विद्यार्थ्या मध्ये कुतूहल,जिज्ञासा व स्वयंअघ्ययानाची प्रेरणादेणारी असली पाहीजे. तसे पाहता शिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रीया आहे.अलीकडच्या काळातील आलेला नविन ज्ञानसंरचनावादामुळे आधिचा वर्तनवादी विचार मागे पडतो आहे. 2005 साली एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली ने राष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. देशातल्या शिक्षणाची एकूण दिशा स्पष्ट करणारा, शिक्षण कशासाठी, कसे असावे या मागील भूमिका सांगणारा ज्ञानरचनावाद त्यांनी दिला.ज्ञानरचनावाद म्हणजे काय आहे, तर मुल कसं शिकत ?याचा सर्व अंगाशी शास्त्रीय अभ्यासकरुन केलेली मांडणी. मुलं स्वतंत्र विचार करतात. मुलांचे शिकणे केवळ शाळेत नाही तर घर,परिसर,समाज असे सगळीकडे होते. स्वत:च्या अनुभवातूनही त्यांचे शिकणे सतत सुरु राहते. मुलांची प्रत्येक कृती म्हणजे ज्ञानाचा स्त्रेात असते. मुलं स्वत: ज्ञानाची निर्मीती करतात याचाच अर्थ मुलांचे जिवन आणि शिक्षण हे वेगळे करता येत नाही. मात्र त्यांचा मेळ घालायला हवा. जिवनाशी शिक्षण जोडण्यासाठी शिक्षणात मुलांचे सांस्कृतीक भांडवल वापरले पाहिजे अशा अध्ययन अनुभवांची, कृतीची रेलचेल असली पाहिजे यावर ज्ञानरचना वादाचा भर आहे.शिक्षण क्षेत्रातील हे नवे आव्हान ठरत आहे.सन 2009 मध्ये आलेल्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमामुळे परीक्षेचे महत्व काहिसे कमी झाले.परीक्षेच्या तणावातून बाल शिक्षण बाहेर आले. या ऐवजी सध्या वर्षभर सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन सुरु आहे. केवळ पेपर लिहून पास होणे नाही तर निरनिराळ्या तंत्राच्या साह्याने मुलांच्या शिकण्याच्या नोंदी घेतल्या जात आहे.इयत्ता 8 वी पर्यंत गुणांऐवजी श्रेणी दिल्या जात आहे. मुलांना व्यक्ती म्हणून समजून आणि समावून घेणारा बालस्नेही दृष्टिकोन शिकवला जात आहे. एका अर्थाने शिक्षणाचे लोकशाहीकरण होण्यास यामुळे मदत झाली आहे.एक मात्र खरे की एकापाठोपाठ एक असे वेगाने आलेल्या बदलांनी शिक्षण विश्वात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये या साठी या बदलांचे स्वागत करीत असतांना ते अतिशय काळजीपूर्वक संयमाने लागू करायला हवे. त्या करता इथला समाज,प्रादेशिकता,संस्कृती,लोकांच्या जगण्यातील विविधता, वौशिष्ट एकूणच शाळेतील पर्यावरणावर परिणाम करणारे घटक विचारात घ्यायला हवे. या कामात अनुभवी व्यक्ती स्वयंसेवी संस्था, शासन,संघटना तसेच प्रयोगशील शाळांचा सहभाग घेण्यात आला पाहिजे. परस्पर सहभागाने आणि पारदर्शकपणे एकमेकांचे काम सुधारत पुढे जायला हवे.आज हा खुलेपणा शिक्षक, शासन,स्वयंसेवी संस्था या सर्वांनीच दाखविण्याची गरज आहे.या सर्व घटकांच्या समन्वयाने आजच्या शिक्षणातील आव्हाने पेलून नविन रचनावादी शिक्षणाचा मळा फुलेल, बहरेल असा विश्वास वाटतो.
Thursday, March 13, 2014
समूह साधन केंद्राची नावे
- वळण
- कणगर
- गुहा
- ताराहाबाद
- देसवंडी
- देवळाली
- उंबरे
- भटारकर वस्ती
- सडे
- बारागाव नांदुर
- म्हैसगाव
- वांबोरी
- टाकळीमिया
- सोनगाव
- न .पा
Subscribe to:
Posts (Atom)